शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

// श्री स्वामी समर्थ //
      " ब्रह्मचैतन्य "
"श्रीराम जय राम जय जय राम "
सातारा जिल्ह्यातील गोंदावले या गावाचे रहिवासी म्हणजे गोंदवलेकर महाराज.त्यांचे अध्यात्मिक गुरु तुकामाई यांनी त्यांना दिलेले नाव म्हणजे " ब्रह्मचैतन्य ". गोंदवलेकर महाराजांनी अतिशय सोपा असा तेरा अक्षरी मंत्र सर्व सामान्यांसाठी दिला आहे. "श्रीराम जय राम जय जय राम" हा अत्यंत तेजस्वी असा तेरा अक्षरी मंत्र आहे.या मंत्राचे किंवा नामाचे महत्त्व विषद करणारी त्यांची ३६५ दिवसांची प्रवचने आहेत.नाम स्मरण हे आपण सहजपणे घेत असलेल्या श्वासा सारखे व्हावे या साठी विवीध प्रकारच्या उपाययोजना त्यांनी या प्रवचनातून सांगितल्या आहेत. आमच्या घरी सुध्दा महाराजांची ३६५ दिवसांची प्रवचने असलेले पुस्तक आहे.माझे वडील दररोज त्या दिवशीचे प्रवचन वाचत असत.पहाटे साडेतीन वाजता ब्राह्म्य मुहूर्तावर नामस्मरण करणे हा त्यांचा शेवटच्या दिवसा पर्यंत चालू राहिलेला कार्यक्रम होता. १९ सप्टेंबर २००४ या दिवशी दुपारी दोन ते तीन या वेळात अत्यंत आनंदात महाराजांनी ठरवून दिलेला तेरा अक्षरी मंत्र म्हणत होते. साधारणपणे ३.३० वाजता अंगात स्वच्छ कपडे घालून आणि कपाळाला व्यवस्थित गंध लावून ,डोक्यावर गांधी टोपी घातलेल्या अवस्थेत कोणताही आजार नसलेल्या वडीलांनी या जगाचा निरोप घेतला घेतला ......!
पंधरा दिवसांनी सहज म्हणून गोंदवलेकर महाराजांचे प्रवचनांचे पुस्तक हातात घेतले. १९ सप्टेंबर या दिवशीच्या प्रवचनात महाराजांनी सांगितलेले आहे की शेवटच्या श्वासा नंतरच्या काळात गुरु तुमच्या नामस्मरणाची काळजी घेतील !
विनायक जोशी ( vp )
28 April 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा