शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

"गण गण गणात बोते"

// श्री स्वामी समर्थ //
      " जय गजानन "
  " गण गण गणात बोते "
कोणत्याही कामाची सुरवात "जय गजानन " या षडाक्षरी मंत्राने केली कि अत्यंत अवघड वाटणारे काम सुद्धा  निर्विघ्न पणे पार पडते याचा अनुभव माझ्या आईच्या मुळे मी असंख्य वेळेला घेतला आहे. सलग २६ वर्षे सोलापूर मध्ये आमच्या घरात
'पाडवा ते राम नवमी' असे दहा दिवस चालणारा राम नवमीचा उत्सव हा त्यांच्याच कृपेने व्यवस्थित पार पडत असे.या काळात खुपशा अनोळखी मंडळींचा घरभर वावर असे.ह्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन साधारणपणे दोन महिने आधीपासून आई करत असे.अत्यंत अनपेक्षित पणे कोणीतरी सांगितले म्हणून यावे अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातील  पाहिजे असलेली नामवंत मंडळी अचानक येत असत.
" जय गजानन" या नामा बद्दल थोडाफार जरी अनुभव घ्यायचा असेल तर दासगणू रचित 'गजानन विजय' या पोथीचे वाचन अत्यंत श्रद्धेने करणे .
२००६ साली आई सप्टेंबर पासून ते डिसेंबर पर्यत अंथरूणावर खिळली होती.साधारणपणे जानेवारी मध्ये
" रामनवमी" या उत्सवा बद्दल घरात चर्चा चालू झाली.थोड्याच दिवसात गजानन महाराजांच्या कृपेने आणि योग्य ते औषधोपचार घेतल्याने ती खडखडीत बरी होऊन सोलापूरला उत्सवाला जाण्यासाठी तयार झाली. अर्थातच "अपर्णा रामतिर्थकर "वगैरे मंडळींनी स्वतः होऊन भेटून  उत्तम अशी प्रवचने त्या वर्षी  सादर केली.
आज गजानन महाराज प्रकट दिना निमित्ताने गजानन महाराजांचे श्रद्धा
पूर्वक स्मरण करून अतिशय आनंदाने आणि समाधान पूर्वक आपले काम करत रहायचे!
विनायक जोशी (vp )
18 February 2017
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा