रविवार, १२ जून, २०१६

पु.ल.देशपांडे (१२ जून )

" श्री स्वामी समर्थ "
              " पुल "
" पुल "प्रयाग हाॕस्पिटल मध्ये अॕडमिट झाल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली. दोन दिवसांच्या नंतर पहिल्यांदा लक्षात आले कि हा शेवटचा प्रवास होता. सुनिताबाई नावाच्या अत्यंत जबरदस्त आणि कणखर जोडीदाराने आपल्या असामान्य प्रतिभा असलेल्या
" भाईंचा " हा प्रवास शांत पणे व्हावा या साठी डाॕ.प्रयाग यांच्या बरोबर चर्चा केली.जगातील सर्वोत्तम डाॕक्टर्स या वेळी त्यांच्या संपर्कात होते.प्रत्येक दिवस हा काळजीचे ढग गडद करत होता. दवाखान्याच्या समोर गर्दी होवू नये म्हणून दवाखान्या तर्फे ठराविक वेळेला त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली जात होती. पुलना देवदूत वगैरे संकल्पना मान्य नसल्यामुळे वैकुंठा वरुन त्यांना नेण्यासाठी निघालेल्या विमाना मध्ये अंतू बर्वा , हरीतात्या वगैरे मंडळी होती . सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडायला पाहिजेत या साठी स्वर्गातून दस्तूरखुद्द रावसाहेब आले होते .या सर्वांना बघून अत्यंत आनंदी मनाने " पुल " त्यांच्या बरोबर गेले तो दिवस होता १२ जून  !!!
विनायक जोशी (vp )
12 June 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा