मंगळवार, १४ जून, २०१६

अपघातांची बेटे

" श्री स्वामी समर्थ "
       " अपघातांची बेटे "
पुण्यातील  प्रचंड अशा प्रदूषणाला कमी करणारा पाऊस अजूनही सुरू झाला नाही.आज पासून शाळांची सुरवात असल्यामुळे असंख्य वाहनांची वेळेत पोचण्यासाठीची गडबड चालू होणार आहे. पुण्याचा म्हणून आब राखून असलेला भुरभुरणारा पाऊस अधूनमधून पडत आहे.या शहरा मध्ये प्रत्येक पंधरा किलोमीटर वरती या पावसाचा वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव येतो.या सर्व गडबडीत सर्वांनी प्रत्येक चौकात पसरलेल्या तेलकट आणि निसरड्या भागाकडे लक्ष ठेवले पाहीजे. आपण दररोज ज्या रस्यावरुन प्रवास करतो त्या रस्त्याचे बारीक बारीक पावसामुळे आॕइलच्या  ट्रॕक मध्ये रुपांतर होते.कितीही चांगली गाडी किंवा ब्रेक असले तरी प्रत्येक चौकात बारीक पावसामुळे तयार होणाऱ्या या धोक्यांची नोंद ठेवून सिग्नल्सच्या दोन्ही बाजूस शंभर फुटां पर्यंत अतिशय हळूहळू गाडी चालवणे. गेली दोन वर्षे रस्त्यावर ओला कचरा आणि त्यांच्या पिशव्या  फेकलेल्या आढळतात.या आॕइल व वंगण किंवा ओला कचरा पडलेल्या रस्त्यांवरून पडल्यामुळे बरीच मंडळी दरवर्षी जायबंदी होत आहेत.कोणत्याही प्रकारे गर्दी नसलेल्या रस्यांवर नेहमीच्या सवयीने वेगाने जाणाऱ्यांचे अपघात जास्त होत आहेत. अतिशय सुंदर अशा भुरभुर पडणाऱ्या पावसाळ्यात  सर्वांनी प्रत्येक चौकात किंवा सिग्नल्सच्या ठिकाणी सावधानता बाळगून ही मानव निर्मित अपघाताची बेटे पार करायची आहेत. हे दिव्य पूर्ण वर्षात फक्त ८ते१० दिवस पार पाडावे लागते.असंख्य झाडांना  नव संजीवनी देणारा किंवा पूर्ण शहराचे प्रदूषण कमी करणारा अशा ह्या नितांत सुंदर अशा पावसाचे आपण आनंदाने आणि सुरक्षितता पाळून स्वागत करु या !!
विनायक जोशी (vp )
15 June 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा