गुरुवार, ९ जून, २०१६

नानांचा धायरी हापूस !

" श्री स्वामी समर्थ "
       " पोकळेंचे आंबे "
धायरी ग्राम पंचायत आॕफीसच्या बरोबर समोर पदमावती देवीचे अतिशय सुंदर मंदिर आहे.या मंदिराच्या उजव्या हाताला एक तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या बरोबर मागे " नाना पोकळे " यांचा सुरेख दगडी वाडा आहे. नाना स्वतः R & D दिघी येथे नोकरीस होते.१९८१ च्या आसपास त्यांनी बलसाड येथून आंब्याची रोपे आणून धायरी येथील शेतात लावलेली आहेत.त्या काळात शेतावर पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे नानांनी आणि काकूंनी लांब अंतरावरुन कळशीने पाणी नेऊन ही झाडे वाढवली आहेत.मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरवातीस हा स्पेशल धायरी हापूस तयार होतो.या वेळी पहिल्यांदाच  कोकणातील सराईत मंडळींच्या कडून आंबा ऊतरवून घेतला आहे.या धायरी हापूस बरोबरच रसाळ आणि गोड असा पायरी सुध्दा आहे. कोणत्याही प्रकारे केमीकल्सचा भडीमार न करता पारंपारिक पद्धतीने आंब्याची आढी लावलेली आहे. अतिशय योग्य दरात अत्यंत दर्जेदार असा आंबा यांच्या कडे उपलब्ध आहे. अतिशय रसाळ आणि गोड असलेल्या या आंब्याच्या बरोबरच कर्तृत्ववान व पारमार्थिक बैठक असलेल्या आणि मोठ्या वाड्याला योग्य अशा मोठ्या मनाच्या नानांचे आणि काकूंचे आशिर्वाद घेण्यासाठी मी आणि कल्याणी अत्यंत आनंदाने येथे जाऊन आलो. गेली पस्तीस वर्षे पोकळेंच्या शेतात रमलेल्या या धायरी हापूस ची गोडी काही औरच आहे !!!
विनायक जोशी ( vp )
9 june 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा